लोकनेता न्युज नेटवर्क
मुंबई :- मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी अडकले होते. ही बाब समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर लगेच या विद्यार्थ्यांना मणिपूर इंफाळहून आसामच्या गुवाहाटी येथे विशेष विमानाने आणण्यात आले. तिथून विशेष विमानाने या विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन झाले. मणिपूर येथील दंगलीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई येथे सुखरूप परत आणण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेऊन प्रयत्न केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. याला म्हणतात कार्यतत्परता. उगाच भाषणबाजी न करता राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन त्या दिशेने कार्यवाही केली त्याबद्दल आपल्या महाराष्ट्र सरकारचे अभिनंदनच करायला हवे.असे संकेत नागरिकांनी दर्शवले.
____________________________________
संबधित बातम्या
Chandrayan 3 Landing Successful ! चांद्रयान- ३ ने रचला इतिहास
आष्टी नगर पंचायत कार्यालयाच्या वतीने मेरी माटी मेरा देश ह्या कार्यक्रमाचे आयोजन
युएस ऍग्री सीड्स कंपनीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त केले वृक्षारोपण