लोकनेता न्युज नेटवर्क
मुंबई :- महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहराच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे, केंद्र सरकार यापूर्वीच उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यास अनुमती असल्याचे म्हटले होते, तसेच आता औरंगाबाद शहराचे ही नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे ,महाराष्ट्रातील सध्याच्या शिंदे, फडणवीस, सरकारला मिळालेले हे मोठे यश म्हणावे लागेल , केंद्र सरकारच्या या निर्णयाची प्रत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे, औरंगाबाद चे छत्रपती संभाजीनगर ,उस्मानाबादचे, धाराशिव ,राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी, मा, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय मंत्री मा, अमित भाई शहा यांचे महाराष्ट्र सरकारने आभार मानले.
प्रतिनिधी|विजय रोडे
___________________________________
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.