December 7, 2025

शिरूर मध्ये गाजली कवितांची मैफील

एक मैफिल कवितांची साहित्य मंच महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षपदी महाबली मिसाळ

लोकनेता न्युज नेटवर्क

शिरूर :- “एक मैफिल कवितांची साहित्य मंच महाराष्ट्र राज्य “आयोजित शिरूर येथे भव्य राज्यस्तरीय काव्य संमेलन मोठ्या दिमाखात पार पडले , दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ या दिवशी शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आलेल्या जवळ जवळ ९० साहित्यिकांनीं आपापली रचना कविता सादर सादर केल्या. तसेच मोठ्या संख्येने साहित्य प्रेमी यांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लाऊन कार्यक्रमाचा आनंद अनुभवला. कवी महाबली मिसाळ यांचा आडवाटेच पारनेर व पारनेर साहित्य साधना मंच यांच्याकडून वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक ,पाठ्यपुस्तकातील कवी व गीतकार मा. हनुमंत चांदगुडे सर कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. अमोल नानाभाऊ पठारे (घोडनदी एंटरप्राईजेस शिरूर )मार्गदर्शक म्हणून प्रा. डी एस कुलकर्णी प्रा.डॉ. राजाभाऊ भैमुले, प्रा क्रांती पैठणकर .
सत्कारमूर्ती म्हणून श्री गुलाबराव दसगुडे दादा( उद्योगरत्न )डॉ. श्री नितीन पवार (पत्रकार काव्यरत्न)श्री.भाऊसाहेब पाचुंदकर (कामगाररत्न )श्री.सुरेश धोत्रे (साहित्यरत्न )डॉ.प्रा. ईश्वर पवार (काव्यरत्न) तसेच या कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थिती म्हणून श्री. प्रसाद बोरकर (मुख्याधिकारी शि.न.पा) इत्यादी मान्यवर उपस्थित होते. काही मान्यवरांनी आपापले मत व्यक्त केले .

मा.हनुमंत चांदगुडे सर आपले मत व्यक्त करताना म्हणाले की , सगळ्यात जास्त मानसन्मान मिळतो तो कवी कवयित्रींना व अपमानही कोणाच्या वाटेला येतो तर कवी कवयित्रींना. कविता म्हणजे काय तर “स्वतःच्या मनातलं बोलणं , मनातला स्वतःशी साधलेला संवाद पेनाच्या माध्यमातून कागदावर लयबद्ध पद्धतीने उतरवन म्हणजे कविता” .

“कवीला जात ,धर्म,पंथ नसतो, कवी मोठा नसतो, कवी छोटा नसतो कवी हा कवीच असतो असे मत व्यक्त केले.

कवी कवयित्रीच्या कविता एकापेक्षा एक सरस आणि त्यातून काहीतरी समाजाला बोध ,संदेश देणाऱ्या होत्या.
या कार्यक्रमाला प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी साहित्य प्रेमी व महाराष्ट्र साहित्य दर्पण या वृत्तपत्रांचे संपादक , प्रसिद्ध कवी श्री गुलाब राजा फुलमाळी सर व शिरूर ग्रंथालय सेवा संघ अध्यक्ष श्री. विवेकानंद फंड सर हेही उपस्थित होते.
प्रथम क्रमांक शिवानी त्रिमले मानाची ढाल व रोख रक्कम ४४४४ रू, द्वितीय क्रमांक प्रवीण बोपुलकर ३३३३ रू, तृतीय क्रमांक चंद्रकांत चाबुकस्वार २२२२ रू व उत्तेजनार्थ आर्या राणी ११११ रू रोख पारितोषिक देण्यात आले.
विशेष लक्षवेधी कविता देवेंद्र गावंडे यांना मान मिळाला. सर्व सहभागी कवी, कावयत्रिना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षकाची धुरा श्री. सागर काकडे सरांनी सांभाळली.

चहा, नाश्ता व रुचकर जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती .

विशेष सहकार्य मा.मच्छिंद्र जामदार , श्री. संतोष काळे, श्री.विशाल जोगदंड, श्री. विशाल कांबळे , संतोषभाऊ शिंदे, श्री.अशोक ईश्वरे, सूत्रसंचालक प्रा.कवी तुषार ठुबे , श्री.नितीन रणदिवे यांनी केले .

या संमेलनाच्या नियोजनासाठी अध्यक्ष कवी महाबली मिसाळ सर, उपाध्यक्ष कवी मनोज दिक्षित, खजिनदार डॉ.बाबा शिंदे , कार्याध्यक्ष कवी कूमोद रणदिवे सर, सचिव कवी उमेश गोरे यांनी कोणाला कशाची कमी भासू दिली नाही .
विश्वस्त श्री. अविनाश लष्करे ( कवी, लेखक) श्री. आनंद डोळस (कवी, लेखक, गायक, दिग्दर्शक) श्री. सुरज सुर्यवंशी (कवी, लेखक) श्री. नितिन रणदिवे यांनी अपार कष्ट घेतले.

प्रतिनिधी|संतोष कदम

________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author