May 8, 2024

कोल्हापूर येथील काडसिध्देश्वर स्वामी मठात विषबाधा होऊन ५० गाईंचा मृत्यू झाला कसा व कशामुळे झाला वार्तांकनासाठी माहिती घेण्यास गेलेल्या पत्रकारास स्वयंसेवकांनी केली धक्काबुक्की

लोकनेता न्युज नेटवर्क

कोल्हापुर :- कोल्हापूर कणेरी येथील काडसिध्देश्वर पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे,येथे पशु पर्दशन देखील भरविण्यात आले आहे,हा कार्यक्रम सुरू असताना च मठातील ५० गाईंचा विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली,हि विषबाधा शिळे अन्नपदार्थ खाऊ घातल्यामुळे गाईंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, ३० गाईंची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत, गाईंची शवविच्छेदन करून गाईंचा मृत्यूची माहिती मिळणार असल्याचे म्हटले जात आहे, या घटनेतील माहिती घेऊन वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांशी धक्काबुक्की करण्यात आली, हि बाब अत्यंत निंदनीय आहे , या घटनेत मठातील स्वयंसेवक व त्यांच्या सोबत जे आहेत त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

प्रतिनिधी|विजय रोडे

____________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!